मानस माझे दाटून तेंव्हा आले होते /
अंत:करणी ओथंबून दव आले होते//
जिला ठेविले जपून सुगंधी अत्तरदाणीत/
कसे हे तीक्ष्ण फ़ुलांनी केले होते//
चुका नेहमी होती, जाती ठेवून जखमा /
जखमांनाही आता कसे कळवळले होते//
मी केलेला गुन्हाच नव्हता रडण्यापडण्याजोगा/
गोंधळ करूनी तूच तयाला मोठे केले होते//
फ़ार वाटले होते तिजला फ़ुटेल पाझर आता/
उत्तर नकी होता माझे गणितंच चुकले होते//
समोरच्याने जरीही आता समज दाविली थोडी/
हातामधूनी निसटंत जगणे कधीच गेले होते//
सगळे साले स्वार्थासाठी लचके तोडून गेले /
स्वच्छ भावनांशी जणु त्यांनी सुतक पाळले होते//
हा एकाकी होऊन गेला प्रशांतेने सागर ./
तरंग उठला एक तरीही गलबलल्यागत होते//
सारे विसरोत याचे वाईट ना वाटे मला./ वाटते वाईट त्यांना विसरता येईना मला./ वाचला वेदांत अन क्षणमात्र त्यांना विसरलो./ दोस्तहो दुस-या क्षणी वेदांत सारा विसरलो./
रविवार, 2 जनवरी 2011
बुधवार, 20 अक्टूबर 2010
दसरा व चतुश्रृंगी देवीसमोरची रांग ...............
दाटून आली कातरवेळी सांज दिवाणी/
तव अधरांना चुंबून गेली सांज दिवाणी/
नवरात्रीही झाल्या आता असह्य मजला/
दर्शनरांगां खट्याळ हसते सांज दिवाणी/
संध्यावंदन करण्या नदीतटी संन्यासीगण /
भूलवून जाते त्यांना सुध्दा सांज दिवाणी/
संध्याकाळी सजणा-या त्या रातराणीला/
हिंदोळ्यावर खेळवते ना सांज दिवाणी/
मग एकाकी होतो आपण म्लाण मुखाने/
आठवत जाते तिच्या मिठीतील सांज दिवाणी/
नटून थटून मग कुणी एकटे निघते तिकडे/
वाट पाहते त्याच्याही आधी सांज दिवाणी/
छान , मोकळ्या अवखळणा-या केसांमधल्या/
गज-याशी त्या झोंबत असते सांज दिवाणी/
चुडीदार मग बहरून येतो तिने घातला/
तिच्यासवे मग बहरत जाते सांज दिवाणी/
दूरूनच दिसते येताना ती मंदगतीने/
त्यालाही मग अवचित डचते सांज दिवाणी//
प्रथम दिलेल्या पत्राचा मग दरवळ येतो/
तिच्या तोंडूनी अवखळ हसते सांज दिवाणी //
थरथरनारा हात पुन्हा मग ऊरी विसावे/
मंतरते त्या स्पंदानांही सांज दिवाणी/
सात्विक स्नेहा दिली कितीही दूषणे त्यांनी/
त्यांना सुध्दा पूरून उरते सांज दिवाणी/
This idea of writing Gazal came to me when i was struggling to get in to the long line of Chatushringi devotees. i immidiately came out of that fuss and reached my hostel.i suddenly went to the memory line of Ambajogai where i was habituated to the Yogeshwaari Devi,which is the abode of Bhagvatee.
this simple plot striked me to write gazal which is being a lietmotief .
How a wonderful evening (Saanj) make everyone restless and how we feel the sense of incompleteness ,when we do not find companion to share the musty thrill of evening. it is not only the celebration of fullness of companionship but the inherent instinct of man to share the agony and ecstasy of mind.
The marathi song "सांज ये गोकुळी "sung by Lata Mangeshkar is the stimulus to write this gazal. hope it will be the gift for Diwali and Daaara for all my blog readers.
तव अधरांना चुंबून गेली सांज दिवाणी/
नवरात्रीही झाल्या आता असह्य मजला/
दर्शनरांगां खट्याळ हसते सांज दिवाणी/
संध्यावंदन करण्या नदीतटी संन्यासीगण /
भूलवून जाते त्यांना सुध्दा सांज दिवाणी/
संध्याकाळी सजणा-या त्या रातराणीला/
हिंदोळ्यावर खेळवते ना सांज दिवाणी/
मग एकाकी होतो आपण म्लाण मुखाने/
आठवत जाते तिच्या मिठीतील सांज दिवाणी/
नटून थटून मग कुणी एकटे निघते तिकडे/
वाट पाहते त्याच्याही आधी सांज दिवाणी/
छान , मोकळ्या अवखळणा-या केसांमधल्या/
गज-याशी त्या झोंबत असते सांज दिवाणी/
चुडीदार मग बहरून येतो तिने घातला/
तिच्यासवे मग बहरत जाते सांज दिवाणी/
दूरूनच दिसते येताना ती मंदगतीने/
त्यालाही मग अवचित डचते सांज दिवाणी//
प्रथम दिलेल्या पत्राचा मग दरवळ येतो/
तिच्या तोंडूनी अवखळ हसते सांज दिवाणी //
थरथरनारा हात पुन्हा मग ऊरी विसावे/
मंतरते त्या स्पंदानांही सांज दिवाणी/
सात्विक स्नेहा दिली कितीही दूषणे त्यांनी/
त्यांना सुध्दा पूरून उरते सांज दिवाणी/
This idea of writing Gazal came to me when i was struggling to get in to the long line of Chatushringi devotees. i immidiately came out of that fuss and reached my hostel.i suddenly went to the memory line of Ambajogai where i was habituated to the Yogeshwaari Devi,which is the abode of Bhagvatee.
this simple plot striked me to write gazal which is being a lietmotief .
How a wonderful evening (Saanj) make everyone restless and how we feel the sense of incompleteness ,when we do not find companion to share the musty thrill of evening. it is not only the celebration of fullness of companionship but the inherent instinct of man to share the agony and ecstasy of mind.
The marathi song "सांज ये गोकुळी "sung by Lata Mangeshkar is the stimulus to write this gazal. hope it will be the gift for Diwali and Daaara for all my blog readers.
सोमवार, 4 अक्टूबर 2010
मी गजला का लिहितो----.माझी नवी गजल..
असह्य जगणे सुसह्य करण्या लिहितो गझला /
मीठीत तुझिया विरघळण्याला लिहितो गझला /
छक्के पंजे बावरलेले ,गोंधळ्लेही/
जिंकून घेण्या डाव रडीचा लिहितो गझला /
स्नेहसरोवर दाटून आला नयनी तुझिया /
बिंदू होऊन त्यात मिसळण्या लिहितो गझला /
फार पाहिली वाट तुझी मी त्या दिवशीला/
त्या घाटाची वाट शोधण्या लिहितो गझला /
पाठमोरी तू किती देखणी वळली होतीस/
गज-याचा त्या गंध ऊजळण्या लिहितो गझला /
वीणा घेऊन रियाझ करण्या बसलेले ते/
मोहक रुपडे आळवण्याला लिहितो गझला /
कृतार्थ होईल असे वाटले जगणे माझे/
तुझाच राणी ठाव शोधण्या लिहितो गझला /
One of my friends, Shrikant Susar, keeps on asking me the same question of my motive of writing Gazaals.
This gazal is the poetic rejoinder to this question....which i have written in late night i.e.2.30 am.
The last couplet i.e.Makhta.is the concluding remark of my intention of my journey to Gazal.
मीठीत तुझिया विरघळण्याला लिहितो गझला /
छक्के पंजे बावरलेले ,गोंधळ्लेही/
जिंकून घेण्या डाव रडीचा लिहितो गझला /
स्नेहसरोवर दाटून आला नयनी तुझिया /
बिंदू होऊन त्यात मिसळण्या लिहितो गझला /
फार पाहिली वाट तुझी मी त्या दिवशीला/
त्या घाटाची वाट शोधण्या लिहितो गझला /
पाठमोरी तू किती देखणी वळली होतीस/
गज-याचा त्या गंध ऊजळण्या लिहितो गझला /
वीणा घेऊन रियाझ करण्या बसलेले ते/
मोहक रुपडे आळवण्याला लिहितो गझला /
कृतार्थ होईल असे वाटले जगणे माझे/
तुझाच राणी ठाव शोधण्या लिहितो गझला /
One of my friends, Shrikant Susar, keeps on asking me the same question of my motive of writing Gazaals.
This gazal is the poetic rejoinder to this question....which i have written in late night i.e.2.30 am.
The last couplet i.e.Makhta.is the concluding remark of my intention of my journey to Gazal.
बुधवार, 29 सितंबर 2010
ज्ञानेश्वरीला ७२० वर्षे पूर्ण झाली
सर्वांना सांगण्यास आनंद होतो की,
आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीला ७२० वर्षे पूर्ण झाली.
आपणा सर्वाच्या कल्याणासाठी माऊली शांत रसात वर्षली आणि मराठी साहित्य़ाला परिपुष्ट केलं...
आर्ताचेनि ओरसे/गीतार्थग्रथनमिसे /
वर्षला शांतरसे /तो हा ग्रंथु ///
छप्पन मराठी बोलीभाषांचा वापर करून जनसामान्यांपर्यंत वेदांतातली गूढतम तत्वे पोचवली आणि ओवी या मराठी छंदाला नवा प्राण दिला.
म्हणूनी सद्भावाची आंजुळी/मिया ओवियाफ़ुले मोकळी/
अर्पिली आंघ्रियुगुळी /विश्वरूपाच्या/////
बरोबर ७२० वर्षांपूर्वी भाद्रपद वद्य षष्ठीला शके १२१२ साली हा ग्रंथ मूर्त झाला..
सर्वांनीच या गोष्टीचे साहित्यिक,सांस्कृतिक मूल्य जाणून ज्ञानेश्वरीचा आभ्यास करण्याचा संकल्प करु या...
आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीला ७२० वर्षे पूर्ण झाली.
आपणा सर्वाच्या कल्याणासाठी माऊली शांत रसात वर्षली आणि मराठी साहित्य़ाला परिपुष्ट केलं...
आर्ताचेनि ओरसे/गीतार्थग्रथनमिसे /
वर्षला शांतरसे /तो हा ग्रंथु ///
छप्पन मराठी बोलीभाषांचा वापर करून जनसामान्यांपर्यंत वेदांतातली गूढतम तत्वे पोचवली आणि ओवी या मराठी छंदाला नवा प्राण दिला.
म्हणूनी सद्भावाची आंजुळी/मिया ओवियाफ़ुले मोकळी/
अर्पिली आंघ्रियुगुळी /विश्वरूपाच्या/////
बरोबर ७२० वर्षांपूर्वी भाद्रपद वद्य षष्ठीला शके १२१२ साली हा ग्रंथ मूर्त झाला..
सर्वांनीच या गोष्टीचे साहित्यिक,सांस्कृतिक मूल्य जाणून ज्ञानेश्वरीचा आभ्यास करण्याचा संकल्प करु या...
मंगलवार, 21 सितंबर 2010
PurushottamTrophy...'मास्तर तुमचच नाव लिवा'
Last week i happened to watch the fianal shortlisted 9 one act playsfor Purushottam Karandak in Bharat Natymandirl,Pune.My friend Vitthal kale ,who is maverick in this field was with me..The number of computer and internet related one act plays were big in number,as there names run thus.,,,,Page not found,Sign out,Farmwell, and so on..
The one act play 'page not found',which got first prize is the biting coment on present technically virtual generation.one of the character in this play says to his father to come online so that they can extend their mutual discussion.the virtual reallity created by cyberpunky world is so obsessive that he is totally unaware of his family and the pining sweetheart..by ignoring the real parential suggestions he get engrossed in the virtually created family,which he thinks,care for him.
The one Act play 'Naav(नाव)' which was based on the poem 'मास्तर तुमचच नाव लिवा' by noted poet Narayan Surve.I loved it most.the idea that one poem can insire to write this wellwrought play...
Now a days im having the actual theatrical experience.at least of watching very minutely the intricacies.
its good.....
The one act play 'page not found',which got first prize is the biting coment on present technically virtual generation.one of the character in this play says to his father to come online so that they can extend their mutual discussion.the virtual reallity created by cyberpunky world is so obsessive that he is totally unaware of his family and the pining sweetheart..by ignoring the real parential suggestions he get engrossed in the virtually created family,which he thinks,care for him.
The one Act play 'Naav(नाव)' which was based on the poem 'मास्तर तुमचच नाव लिवा' by noted poet Narayan Surve.I loved it most.the idea that one poem can insire to write this wellwrought play...
Now a days im having the actual theatrical experience.at least of watching very minutely the intricacies.
its good.....
शनिवार, 18 सितंबर 2010
माझी नवी गझल....
गोडगुलाबी थंडीमधली आठवण झाली/
स्पर्शुन गेल्या मंद हवेची आठवण झाली/
केस मोकळे ओले सोडून बसली होतीस /
थंडथंड त्या जलस्पर्शची आठवण झाली/
आज न्हाऊनी आली आसावी सकाळ सखये/
भुरभुरणा-या तव केसांची आठवण झाली/
माळून आली होतीस गजरा बकुळीचा तू/
मंतरलेल्या त्या श्वासांची आठवण झाली/
झाले भांडण बहुधा तेंव्हा पणतीचे तुळशीशी /
तुझ्या मखमली मंजुळ ध्वनीची आठवण झाली/
समोर तू येताना मी गलबलूनी गेलो /
विसरून गेल्या त्या पत्राची आठवण झाली/
तू काही अन मी काहीतरी बॊलत होतो/
नेमकेच राहून गेल्याची आठवण झाली/
All those striking mamories of a imaginary lover has been brought up for u....
enjoy it...As i am the student of Kholeshwar College,Ambajogai,which was the starting point of my literary pilgrimage and where i got the sumptous stimulus of my Gazal.
स्पर्शुन गेल्या मंद हवेची आठवण झाली/
केस मोकळे ओले सोडून बसली होतीस /
थंडथंड त्या जलस्पर्शची आठवण झाली/
आज न्हाऊनी आली आसावी सकाळ सखये/
भुरभुरणा-या तव केसांची आठवण झाली/
माळून आली होतीस गजरा बकुळीचा तू/
मंतरलेल्या त्या श्वासांची आठवण झाली/
झाले भांडण बहुधा तेंव्हा पणतीचे तुळशीशी /
तुझ्या मखमली मंजुळ ध्वनीची आठवण झाली/
समोर तू येताना मी गलबलूनी गेलो /
विसरून गेल्या त्या पत्राची आठवण झाली/
तू काही अन मी काहीतरी बॊलत होतो/
नेमकेच राहून गेल्याची आठवण झाली/
All those striking mamories of a imaginary lover has been brought up for u....
enjoy it...As i am the student of Kholeshwar College,Ambajogai,which was the starting point of my literary pilgrimage and where i got the sumptous stimulus of my Gazal.
शुक्रवार, 3 सितंबर 2010
चित्तरंजन भटांची गजल
कधी तुझा देह चंदनाचा, कधी तुझे ओठ केसराचे /
दिसुन जातात संधीकाळी कसे कसे रंग अंबराचे //
प्रवाळ प्रत्येक सोसण्याचा जपून मी ठेवला तळाशी /
उगीच का हे तयार झाले उरात बेट अत्तराचे //
तुझ्यानी माझ्या चुकामुकीचे कशास अ़क्षांश शोधतो मी /
कधीतरी छेद जायचे का समांतराला समांतराचे ///
just some days ago i was looking for some new gazals and i got it.
in the first appearance it seems quite obscure and hard to crack but its really delicious after uncovering .
the last line which is known as 'makta' in urdu, is touchy.the gneral rule of mathematics has been applied by poet with utter dexterity.
im now convinced that Chittaranjan Bhatt who is son of Late gazal nawaz Suresh Bhatt will really ascend the thrown of Gazal. good.....
दिसुन जातात संधीकाळी कसे कसे रंग अंबराचे //
प्रवाळ प्रत्येक सोसण्याचा जपून मी ठेवला तळाशी /
उगीच का हे तयार झाले उरात बेट अत्तराचे //
तुझ्यानी माझ्या चुकामुकीचे कशास अ़क्षांश शोधतो मी /
कधीतरी छेद जायचे का समांतराला समांतराचे ///
just some days ago i was looking for some new gazals and i got it.
in the first appearance it seems quite obscure and hard to crack but its really delicious after uncovering .
the last line which is known as 'makta' in urdu, is touchy.the gneral rule of mathematics has been applied by poet with utter dexterity.
im now convinced that Chittaranjan Bhatt who is son of Late gazal nawaz Suresh Bhatt will really ascend the thrown of Gazal. good.....
सदस्यता लें
संदेश (Atom)
-
रामायणाची आरती आरती रामायण ग्रंथा जानकी जीवन रघुनाथा !ध्रु! आरंभी बालकाण्ड रचना| वाल्मिकी कथीली असे सूचना| कोटी शतग्रंथ विवेक भरणा| वर्णिता ...
-
निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले माना अगम अगाध सिन्धु है संघर्षो का प...
-
https://youtu.be/fuzmdOvDFzM "हरिवरदा"कार कृष्णदयार्णव चरित्र Krishna Dayarnav Charitra श्रीमद्भागवतच्या दशम स्कंधाव...